मैत्रीच्या विश्वात

0
मैत्री म्हणजे काय वो ?
"मैत्री" म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं एखादं छानसं जाळीदार पान आहे.
जसंजसं त्याचं आयुष्य वाढत जातं तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जातो.
मैत्री करणं सोपं असत पण ती टिकवणे अवघड, मैत्रीत राग लोभ, सुख दुःख , प्रेम या सगळया गोष्टी येतात मग त्यातून मैत्री टिकवणे म्हणजे खरी मित्रता, मैत्री वाऱ्याची झुळूक आहे अनेक नाते जोडून जाते अनेक नाते सोडून जाते, आपल्याला हवे तिकडे घेऊन जाते, मग कॉलेजचा कट्ट्यावर काढलेले ते दिवस आता पुन्हा येतील की नाही माहीत नाही, पण नकळत झालेली रुसवे-फुगवे आज आठवली तरी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी बरे वाटते आणि गालावर छान खळी खुलते, तीच हि मैत्री.

मैत्री मध्ये गैरसमज हा सगळ्यात महत्वाचा दुवा आहे. केव्हा,कुठे, कधी कसा मैत्री त गैरसमज निर्माण होईल काहीच सांगता येत नाही.पण जर एकमेकांना वर विश्वास असला तर मग गैरसमजला मैत्रित स्थान नाही. मैत्री ही बंधन कारक नको.
मैत्रीत "विश्वास" "त्याग" आणि एकमेकांशी मन मोकळे असणे खूप गरजेचे आहे, कारण मैत्रीचं नातं भावनेशी जोडलेलं आहे,  ह्या मुळेच मैत्री खूप काळ टिकून हि राहते.
मैत्रीला बंधन नाही मैत्री कोणाशीही होते, आपल्या मैत्रिचा ठेवा हा सर्वांनी असाच जपुन ठेऊ. मैत्रीच्या विश्वात आपण इतके रमून गेलो असतो की दुरावण्याच्या कल्पनेने अंगावर अगदी काटा उभा राहतो. त्या आठवणी इतक्या गोड असतात कि त्यांना मन कधी दूर जाऊच देत नाही, म्हणूनच मैत्रीच नातं रक्ताच्या नात्यापेक्षा अमूल्य आहे. म्हणूनच मैत्रीच विश्व खूप खोल आहे.

कितीही नाकारली तरी मैत्री होते
अनोळखी असलो तरी मैत्री होते
नसतो इथे हेवा-देवा मैत्र असतो
फक्त आपण तेव्हा,
नसते सजवायची नसते गाजवायची
मैत्रीची नाती रुजवायची असते.

                                                                                          - कृष्णा जोशी

https://www.instagram.com/kinchit_kavi/?hl=en

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)