जुने लेखक आणि त्यांचे विचार

0

          एकदा सहज Youtube वर गाणे ऐकत होतो आणि एक गाणं सुरू झालं सुरुवातीला मला वाटल प्रेम गीत आहे पुढे ऐकल्यावर लक्षात आलं ते तर विरह गीत आहे जे कवी ग्रेस यांनी लिहिलेलं आणि हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केले आहे, गीत असे होते

ती गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे
हा सूर्य सोडवित होता,

पहिल्या 4 ओळीत वाटत हे प्रेयसीसाठी लिहिलं असावं पण ह्या गीताचा खरा अर्थ पुढच्या 4 ओळीत समजून येतो

ती आई होती म्हणुनी
घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध
पाचोळा उडवित होता,

ती गेली कोण प्रेयसी नाही हो, ती गेली ती आई होती आणि तिच्या साठी घनव्याकुळ मी रडत होतो
म्हणजे जिथे आपण  पहिल्या चार ओळींमध्ये आपलेच तर्क लावत बसतो तिथे वरच्या चार ओळी मनाला भावुन टाकतात इथे समजते जुन्या लेखकांची विचारशक्ती, पुढे काय म्हणतायेत

अंगणात गमले मजला
संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा
कंदील एकटा होता.

बाल वयात आपल्यासाठी प्रिय आई असते आणि नेमकं त्याच वयात ती जाण्याने बालपणच हरवून जातं, आणि तेच आपल्या लेखणीतून किती सहजतेने आजूबाजूच्या सगळयाच गोष्टी मांडून टाकल्यात,

ह्या कवी ग्रेस यांच्या ओळी मला फारच भावुन गेल्या आहेत, जिथे आपली विचारशक्ती संपते तिथे यांचे विचार सुरू व्हायचे, जुने लेखक प्रभावी आहेतच आणि जुने लेखक वाचत रहा,
असे अनेक किस्से आहेतच पुढे नक्कीच सांगेल, आता पुरता राम राम.

- कृष्णा जोशी, अहमदनगर

https://www.instagram.com/kinchit_kavi/

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)